रानीवनी पानी का गाऊ लागे हिरवाई
वारा इशारा देई हळुवार सांगी काही
भाळी आभाळी च्या कलानी पसरावे
पर्वत वाट सांगे चाल जाऊ नवख्या गावी
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा
ओले का चिंब हा आसमंत झाला कसा
मला सांग ना रे मना..मला सांग ना....
सावली विसावली अंतरी दिगंतरी
भाळ तू सांभाळ तू उन मी उनाड मी
अनुबंध बंधात गंध रंध्रात हा...भरावा उरावा
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा
ओलेता का चिंब हा आसमंत झाला कसा
मला सांग ना रे मना..मला सांग ना....
गायचे मागायचे धारातुनी अधरातुनी
मिठीत ये मिठास हि पेटुनी लपेटूनी
सौंदर्य दर्यात रंगत रंगातला.. नवासा हवासां
नाही वर्षा तरी मृदगंध आला कसा
ओलेता चिंब हा आसमंत झाला कसा
मला सांग ना रे मना..मला सांग ना....
चित्रपट - शर्यत
स्वर - महालक्ष्मी अय्यर, स्वप्नील बांदोडकर
गीत -
संगीत - चिनार आणि महेश